स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Friday, May 15, 2009

लोकशाही ते दलालशाही....

म.टा/१८.०४.२००९/माणसं


कुमार सप्तर्षी
संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल, महाराष्ट्र.

डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्रातील समाजवादी परिवारातील धडाडीचे आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. सत्तरच्या दशकात स्थापन झालेल्या युवक क्रांती दलाचे ते एक संस्थापक. तेव्हा लोकआंदोलनांनी साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या युक्रांदचे अलीकडेच डॉ. सप्तर्षी यांच्या पुढाकाराने पुनरुज्जीवन झाले आहे. ते पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाचे संपादकही आहेत. 'गांधी स्मारक निधी' या समाजसेवी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
______________________


१९७७ सालची लोकसभा निवडणूक! २६ जानेवारी दिवशी येरवडा तुरुंगामधून सुटलोे. तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणुका जाहीर करून आणीबाणीचे निर्बंध थोडे शिथिल केले होते. १९ महिने वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिपचा बडगा उगारलेला होता. त्यामुळे फक्त इंदिरा गांधींचं नाव पेपरांमध्ये प्रसिद्ध व्हायचं. विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक झाल्याची, त्यांना कुठल्या तुरुंगात ठेवलंय याबद्दल कसलीच बातमी प्रसिद्ध व्हायची नाही. १९ महिने ज्यांचे नाव कानावर पडले नाही, त्यांना लोक नक्कीच विसरले असतील अशी कल्पना सारे करीत होते. पण 'मिसा' कायद्याखाली कारावासात असलेल्या अगदी सामान्य कार्यर्कत्यालाही पाहण्यासाठी गदीर् जमू लागली. हा अनपेक्षित प्रकार होता. ही निवडणूक काँग्रेसच जिंकणार अशी काँग्रेस व काँग्रेसेतर पक्षांची खात्री होती. स्पर्धा नव्हतीच. एका बैलाला १९ महिने रोज एनिमा दिल्यानंतर व त्याला अहोरात्र गोठ्यात बांधून ठेवल्यानंतर तो मरतुकडा होणार हे स्वाभाविक होतं. त्याला चालणंही जड झालेलं. त्याला अचानक सांगण्यात आलं की, 'तुला आज १९ महिने पेंडीचा खुराक खाल्लेल्या बलवान बैलाबरोबर पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा आहे.' अशा शर्यतीचा निकाल पूर्वनिश्चित असतो. तसाच १९७७ लोकसभा निवडणुकीचा निकालही होता. काँग्रेस बहुमताने जिंकणार आणि इंदिरा गांधी आणीबाणीच्या निर्णयावर मतदारांकडून शिक्कामोर्तब करून घेणार, हे उघड दिसत होतं.

निवडणुकीचे वारे वाहू लागले आणि अचानक आक्रित घडू लागलं. तुरुंगातून सुटलेल्या कार्यर्कत्यांना लोक जणू संत वा देवाची माणसं मानू लागले. सजवलेल्या बैलगाडीमधून मिसा स्थानबद्धांच्या गावोगाव मिरवणुका निघू लागल्या. मिसा स्थानबद्ध नाही मिळाला तर त्याच्या लहान मुलाला किंवा एखाद्या नातेवाईकाला गाड्यावर बसवून गावकरी मिरवणुका काढू लागले. विरोेधी पक्षाजवळ पैसा नव्हता, गुन्हेगार नव्हते; पण जनशक्ती होती. राजशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी ठाकली. लोक पेटले होते. जागृत झाले होते. बंधनातून सुटका झाल्यामुळे वृत्तपत्रे सुसाट सुटली होती. आणीबाणीत जे जे गैर घडले, त्याचे चित्र ते जनतेपुढे ठेवत होते. निवडणूक आयोग, आचारसंहिता यांचा धाक राहिला नव्हता. मुद्दा एकच, 'हुकूमशाही हवी की लोकशाही हवी?' जेव्हा भवितव्य ठरविण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो, तेव्हा लोक 'पोलिटिकली करेक्ट' निर्णय घेतात. हिंदी भाषिक राज्यांमधून जनतेने काँगेसची हकालपट्टी केली. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, ओरिसा अशा सहा राज्यांमध्ये जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून आले. अपवाद फक्त राजस्थानात एका मतदारसंघाचा. महाभारत घडले. वनवासातले, शक्तिहीन पांडव विजयी झाले. बलाढ्य कौरव पराभूत झाले.

जनता पक्षाच्या व्यासपीठावर न जाता युक्रांदीय 'नागरी स्वातंत्र्य' नावाच्या स्वतंत्र व्यासपीठावरून आणीबाणीच्या विरोधात प्रचार करीत होते. मला वाटत होते की, काँग्रेस निवडणुका जिंकणार आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान होणार. त्या पुन्हा सर्वांना कारावासात पाठविणार, असेही वाटे. पुन्हा तुरुंगात जाण्याचा प्रसंग आला तर आपण भूमिगत होऊन काम करायचे, असा मी निश्चय केला. म्हणून नगर जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात मी आणीबाणीच्या विरोधात सभा घेऊ लागलो. या उपक्रमाला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सभेनंतर लोकांना मी वर्गणी मागायचो.

९ ऑगस्ट १९७७ रोजी युक्रांदमधील सिनियर कार्यर्कत्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. पूर्वाश्रमीचा कोणताही पक्ष नसलेली, जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेली तरुणांची पिढी जनता पक्षात मी प्रवेश केल्यानंतर माझ्या पाठीशी उभी राहिली. मी जनता पक्षाचे अध्यक्ष चंदशेखर यांचा नगर जिल्ह्यात दौरा आखून तो यशस्वी पार पाडला. माझा पिंड जनआंदोलनाचा आणि त्यातून संघटन करण्याचा. आंदोलनाइतकी निवडणुकीची गोेडी वाटत नव्हती. त्यामुळे जनता पक्षाच्या उमेदवारांचा मनापासून प्रचार करायचा एवढेच ठरविले होते. पण जनता पक्षाने अहमदनगर शहर मतदार संघात मलाच विधानसभेची उमेदवारी दिली.

केंद सरकारमध्ये तेव्हा मंत्री असलेले हेमवतीनंदन बहुगुणा दिल्लीहून निरीक्षक व पक्षश्रेष्ठी म्हणून आले होते. त्यांनी मला मुद्दाम बोलावून घेतले. ते म्हणाले, 'तुला पक्षाने तिकीट का दिले ठाऊक आहे का? तू पुरीच्या शंकराचार्यांबरोबर पुण्यात झालेल्या जाहीर विवादात त्यांची भंबेरी उडवली होतीस. त्या माणसाने उत्तर प्रदेशात गोहत्याबंदी आंदोलन करून खूप हिंसाचार घडवून आणला. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हापासून मी तुला लांबून ओळखतो. चंदशेखरजींनी त्यांचा उमेदवार म्हणून तुझे एकट्याचे नाव सांगितले आहे. एक गोष्ट लक्षात ठेव. तुला यशस्वी व्हावेच लागेल. पक्षात आमची इभ्रत पणाला लागलीय. आंदोलनामधून आलेल्या कार्यर्कत्यांना निवडणुकीतील यशापयशाचे सोयरसुतक वाटत नसते. पण आमच्यासाठी सारे बळ एकवटून लढ.'

बहुगुणा यांच्या बोलण्याने माझ्यात उत्साह संचारला. जॉर्ज फर्नांडिस यांनी एका माणसामार्फत पाच हजार पाठविले. मोहन धारियांनी वीस हजारांचा निधी दिला. माळी समाजाची प्रत्येक निवडणुकीच्या आधी गुप्त बैठक होते. कोणत्याही पक्षातफेर् उभा असो, माळी जातीच्या उमेदवाराला देण्यासाठी ते आथिर्क निधी जमवितात. अकलूज परिसरातील माळी समाज तत्कालीन आमदार शंकरराव मोहित्यांच्या दबावाखाली चूप होता. आतून धुमसत होता. अकलूजला व माळशिरस तालुक्यात शंकरराव मोहित्यांच्या विरोधात सभा घेतल्यामुळे माळी समाज माझ्यावर बेहद्द खूष होता. त्यांनी एक प्रतिनिधी पाठवून मला दहा हजार रूपये दिले. त्यांचा प्रतिनिधी म्हणाला, 'माळी समाजाने तुम्हाला 'ऑनररी माळी' मानले आहे. तुमच्या वाट्याचा हा निधी!'

त्यावेळी नगर शहर छोटे होते. मतदारसंख्या एक लाख होती. बहुतांश लोक एकमेकांना ओळखत. तेव्हा महाविद्यालयाचे तरूण व तरूणी माझ्या बाजूने खूप सक्रिय झाले. पण त्या काळात त्यांना मतदानाचा हक्क नव्हता. मी हस्ताक्षरात पत्र तयार केले. त्याचा ब्लॉक करून आंतरदेशीय पत्रांवर तो मजकूर छापला. ती पत्रे मित्रांना पाठविली. त्यात मी लिहिले होते की, 'किमान शंभर रूपये व कमाल पाचशे रूपये या मर्यादेत निवडणुकीसाठी निधी पाठवा. शंभर रूपयापेक्षा कमी रक्कम पाठविणार असाल, तर कृपया तसदी घेऊ नका. कारण तुम्ही अडचणीत असणार हे उघड आहे. पाचशे रूपयांपेक्षा अधिक रक्कम कृपया पाठवू नये. कारण तुम्ही अधिक रक्कम पाठविली तर तुमच्या माझ्याकडून वैयक्तिक अपेक्षा वाढतील. कदाचित त्या मला पूर्ण करता येणार नाहीत.'

माझे प्रतिस्पर्धी उमेदवार नगरचे तेव्हाचे विद्यमान आमदार व शहराध्यक्ष नवनीत बाशीर्कर होते. ते निवडणुकीच्या डावपेचांमध्ये अतिशय निष्णात. पण त्यांचे सारे डाव निष्प्रभ झाले. याचे एकमेव कारण आहे. मला त्यांचे डावपेच कळतच नव्हते. मी प्रत्येक चौकात दहा मिनिटांच्या सभांचा गदारोळ उठवला. 'प्रामाणिकपणा हाच एकमेव डावपेच' आणि 'जनआंदोलन हेच संघटन' हे सूत्र धरून चाललो. मी अननुभवी, पैसे नसलेला, जात-धर्म न मानणारा म्हणून हमखास पडणार, असे नगरवासियांनी सुरवातीस गृहित धरले. पत्रे पाठविल्यामुळे बावीस हजार रूपये जमा झाले. माझा एकूण खर्च चाळीस ते पन्नास हजारांपर्यंत झाला. अनेक मित्रांनी आपापल्या परीने प्रचाराच्या रिक्षा लावल्या. फलक लावले. भिंती रंगविल्या. त्यांची बिले त्यांनी परभारेच भागवली. एकूण नऊ उमेदवार होते. बहुतेकंाकडे कोणत्यातरी जातीचे गठ्ठा मतदान होते. मला प्रत्येक जातीचे आणि धर्माचे थोडे थोडे मतदान लाभले. एकूण बेरीज इतरांपेक्षा अधिक झाली. ब्राह्माण समाजाने कोऱ्या मतपत्रिका टाकल्या. मी स्वजातीचे दोष जाहीर दिंडोरा पिटवून सांगतो हा त्यांचा माझ्यावर आरोप होता. ते म्हणत, 'आपली आई दिसायला कुरूप असेलही, पण ढोल बडवून जगाला तसे सांगायचे नसते. जात म्हणजे आपली आई! कशीही का असेना ती प्रिय असलीच पाहिजे.'

३१ वर्षे लोटल्यानंतर मी आज काय पाहतो? २ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय विधानसभेची आणि किमान १२ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय पक्ष लोकसभेची उमेदवारी देतच नाही. १९८० सालापासून राजकारणाचे गाडे घसरणीला लागले. सर्व पक्षांच्या (अगदी आमच्या जनता पक्षाच्याही) नेत्यांनी राजकारणात एक भाषा सुरू केली. एका विशिष्ट सुरात सारे बोलत. 'लोक फार बिघडले आहेत, पैसा मिळाल्याशिवाय कुणी मतदान करीत नाही.' उमेदवारी देताना 'व्यक्तीचे चारित्र्य, त्याचे विचार, कार्य, पक्षनिष्ठा' या गोष्टी अत्यंत गौण ठरल्या. उमेदवारीचा एकच निकष बनला, 'इलेक्टीव्ह मेरीट!'. काळा पैसा, पाळीव गुंड व जात यांचे गणित राजकारणात महत्त्वाचे असते, हा विचार गेल्या तीस वर्षात पद्धतशीर रुजवण्यात आला. परिणामी राजकीय पक्ष संपले. कार्यर्कत्यांची जागा दलालांनी आणि वैचारिक भूमिकेची जागा तथाकथित 'सोशल इंजिनअरींग' नामक पोकळ तत्त्वज्ञानाने घेतली. नेते लोकप्रिय राहिले नाहीत. ते 'दलालप्रिय' बनले. पक्षांतर्गत लोकशाही संपविण्यात आली. राजकारण म्हणजे दलाली असे समीकरण बनले. 'दलालशाही' नावाची नवी विचारप्रणाली प्रभावी बनू लागली.

या सर्व घटनांचा परिणाम म्हणून पंधराव्या लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये ठळक झाली आहेत. यावेळी एकही राजकीय मुद्दा धसास लागलेला नाही. बालवाडीतील पोरे जशी पोराटकी करतात, एकमेकांच्या खोड्या काढतात, तशी लोकसभेची निवडणूक चालू आहे. नेते म्हणजे जणू बालवाडीतील व्रात्य पोरे! त्यांना जमेल तेव्हा त्याला केव्हाही चिमटे घ्यायची सवय लागली. खोडेल स्वभाव हेच त्यांचे चारित्र्य! नि:संकोचपणे राजकीय पक्ष गुन्हेगारांना तुताऱ्या फुंकून त्यांच्या पक्षात प्रवेश देतात. वर शेखी मिरवितात, 'वाल्या कोळ्याचा वाल्मिकी बनतो हे लोकांनी लक्षात घ्यावेे.' वास्तविक पुढारीच वाल्या कोळी आहेत; तेव्हा ते दुसऱ्या वाल्यांचे वाल्मिकी कसे करणार? निवडणुकीत पैसा, जातीयवाद व गुन्हेगार या गोष्टींवर हमखास मात करता येते, पण त्यासाठी जनआंदोलन, जनसंघटन, पक्षांतर्गत लोकशाही, जनजागृती या गोष्टींवर विश्वास हवा. अजूनही सारे संपलेले नाही. बहुतांश जनतेला सारे काही कळते. परिस्थिती अशीच चालू राहिली तर राजकीय क्षेत्राचे तुकडे तुकडे होतील. त्यामुळे अराजकाचा झंझावात येऊ शकतो. त्यानंतर काय घडेल; याचा अंदाज पाकिस्तानात आज जे चालू आहे, त्यावरून बांधता येतो..........
मी आज काय पाहतो? २ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय विधानसभेची आणि किमान १२ कोटी रूपये खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय पक्ष लोकसभेची उमेदवारी देतच नाही. १९८० सालापासून राजकारणाचे गाडे घसरणीला लागले. सर्व पक्षांच्या नेत्यांनी राजकारणात एक भाषा सुरू केली, 'लोक फार बिघडले आहेत, पैसा मिळाल्याशिवाय कुणी मतदान करीत नाही.' उमेदवारी देताना 'व्यक्तीचे चारित्र्य, त्याचे विचार, कार्य, पक्षनिष्ठा' या गोष्टी अत्यंत गौण ठरल्या. उमेदवारीचा एकच निकष बनला, 'इलेक्टीव्ह मेरीट!'. काळा पैसा, पाळीव गुंड व जात यांचे गणित राजकारणात महत्त्वाचे असते, हा विचार गेल्या तीस वर्षांत पद्धतशीर रुजवण्यात आला. परिणामी राजकीय पक्ष संपले. कार्यर्कत्यांची जागा दलालांनी आणि वैचारिक भूमिकेची जागा तथाकथित 'सोशल इंजिनअरींग' नामक पोकळ तत्त्वज्ञानाने घेतली. नेते लोकप्रिय राहिले नाहीत. ते 'दलालप्रिय' बनले. पक्षांतर्गत लोकशाही संपविण्यात आली. राजकारण म्हणजे दलाली असे समीकरण बनले. 'दलालशाही' नावाची नवी विचारप्रणाली प्रभावी बनू लागली.

 

अल्प परीचय:

संपुर्ण नाव: डॉ. कुमार गणेश सप्तर्षी
जन्म दिनांक: २१ ऑगस्ट १९४१
घरचा पत्ता: प्रबोधन को ऑपरेटिव हौसिंग सोसायटी,
६१-अ ४/९,एरंडवणा, पुणे-४११००४
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२५४३१७२९)
कार्यालयीन पत्ता: ’क्रांतिनिकेतन’ १४६८ सदाशिव पेठ खजिना विहिर चौक,
एस. पी. क़ॉलेजसमोर, पुणे-४११०३०
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४६१४०९)
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४७५८६६)
शिक्षण: बी. एस्सी. (एस. पी. क़ॉलेज)
एम.बी.बी.स. (बी.जे. मेडिकल क़ॉलेज पुणे)
प्रथम वर्ष (एल.एल.बी)
व्यवसाय: पुर्ण वेळ सामाजीक कार्यकर्ता
संघटनात्मक कार्य: (अ) १९६७- जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली रजौली ग्राम ता. नवादा जि. गया येथे दुष्काळग्रस्तांसाठी मदतकेंद्र चालवले.
(आ) कोयना भुकंपग्रस्ताना मदतकार्य.
(इ) नोव्हें.१९६७ मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना.
(ई) १० मे ते १५ मे १९६८ श्री. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या जंगलात १५०० तरुणांची १५ दिवसांची ‘श्रम संस्कार छावणी’ संघटीत केली.
(उ) आणीबाणी पहिले ३ महिने भुमीगत कार्य, २ ऑक्टोबर १९७५ पासुन २६ जानेवारी १९७७ पर्यंत येरवडा कारागृहात मिसा स्थानबद्ध.
(ऊ) १५ ऑगस्ट २००१ युवक क्रांती दलाची पुन:स्थापना अध्यक्ष म्हणुन कार्यरत

नाशिक जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना जाहीर आवाहन....



जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी- "नमुना ६" (FORM 6) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत- मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी "नमुना ८" (FORM 8) मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- अर्जदारानी "नमुना ६""नमुना ८" खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक १ जून २००९ ते दिनांक २२ जूलै २००९ दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका) तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका) तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका) तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका) तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका) तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका), तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका) तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका) तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप: FORM 6 येथून डाउनलोड करा.FORM 8 येथून डाउनलोड करा


लोकशाही ते दलालशाही....SocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment