स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा.

Tuesday, December 22, 2009

मालेगांवात तोडलेल्या वृक्षांना श्रद्धांजली

मालेगांव, ता. १८-
मानवाने स्वतःच्या फायद्यासाठी वाटेल तशी वृक्षतोड केली. पर्यावरणाचा -हास होण्यास माणूसच कारणीभूत ठरला. आगामी पिढीला पर्यावरण रक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी येथील नवभारत निर्माण संस्थेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. तोडण्यात आलेल्या वृक्षांना प्रतिकात्मक भावपूर्ण श्र्द्धांजली वाहण्याचा अनोखा व आगळावेगळा उपक्रम येथे लक्ष वेधून गेला.
शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी एकत्र जमा झाले. छ. शिवाजी महाराज पुतळा, मोसम पूल, एकात्मता चौक व विविध रस्त्यांवरून जनजागृती रँली काढण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या हातात विनावृक्ष जीवन रुक्ष, आता फक्त एकच चळवळ... लावा वृक्ष करा हिरवळ, माणसाची हाव... पर्यावरणावर घाव, टाळावया आपत्ती.. जोपासा वनसंपत्ती, माणूस झकास... पर्यावरण भकास असे बोलके लक्षवेधी फलक होते. वृक्षांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जनजागृती फेरीत शहरांतील झुं.प.काकाणी विद्यालय, र.वि.शाह (वर्धमान) विद्यालय, मुनिसिपल हायस्कूल, म.स.गा.कन्या विद्यालय, ए.टी.टी हायस्कूल, दौलती इंटर्नँशनल, आदिनाथ इंग्लिश मिडिअम स्कूल आदी विद्यालयांचे विर्द्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. पर्यावरण रक्षणाबाबत प्रतीकात्मक श्रंद्धाजलीच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
नवभारत निर्माण संस्थेचे डाँ. जतीन कापडणीस, निक्की पाटील, प्रमोद बच्छाव, विवेक पवार, विशाल पाटील, नरेंद्र पवार आणि संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.


मालेगांवात तोडलेल्या वृक्षांना श्रद्धांजलीSocialTwist Tell-a-Friend

No comments:

Post a Comment